हिमाचल प्रदेशातलं लाहौल स्पिती खोरं. इथल्या लिंडूर गावातली जमीन गेल्या काही वर्षांत अक्षरश: धसत चाललीय. इथल्या फळबागाच नाही; तर इथल्या माणसांचे पिढ्यानुपिढ्यांचे कष्टही त्यात मातीमोल होतायत. हे गाव गायब होतंय; अगदी डोळ्यांदेखत!
वसीम कुरेशीचं स्वातंत्र्य पोलिओनं हिरावलं. विद्यार्थी दशेत शाळेत सुयोग्य जिन्यांसाठी तरसलेला वसिम, आता स्वयंरोजगारासाठी शासकीय योजनांची पायरी शोधतोय. विकलांगांच्या पायाखालचा रस्ता किती ठिसूळ कितपत पक्का याचा वेध घेणारी ग्रामीण हरियाणामधील हकीगत. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त...
नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वी मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) करण्यात आली. त्यात अनेक आदिवासींची नावं वगळल्याचं समोर आल्यावर काळजी नि निराशेचं सावट पसरलं. नंतर काही नावं मतदारयादीत पुन्हा घातली गेली खरी; पण मुळात ती काढलीच कशासाठी?
तापमानवाढ हा केवळ पर्यावरणीय वर्तुळातील अकादमिक ‘सब्जेक्ट’ नव्हे. हे संकट सर्वसामान्यांना होरपळून काढतंय. कष्टकरी महिलांमधील निद्रानाश, त्यापाठोपाठ खालावणारं मन:स्वास्थ नि थकवा, शिवाय चिडचिडीतून दुरावलेली नाती हा याच जगड़व्याळ समस्येचा कंगोरा, सांगताहेत कोल्हापूरच्या महिला
तामिळनाडूतलं विरुधाचलम्. मातीकाम करणारे इथले कलाकार सिरॅमिक मूर्ती आणि मातीचे दिवे बनवतात. हल्ली त्यांना या कामातून ना स्थिर उत्पन्न मिळतं; ना दमदार ओळख! तरीसुद्धा ते कार्यरत राहतात; मातीमय कलेतून मातीमय कथा साकारण्यासाठी!
विदर्भातल्या पिंपळेगाव सराई गावात मूळ रहिवाशांपेक्षा स्थलांतरित कुटुंबांची संख्या जास्त आहे. इथल्या एका दर्ग्यात मानसिक आजारांवर तांत्रिक उपचार होतात म्हणून हे लोक वर्षानुवर्षं इथं राहतायत
Parth M.N., P. Sainath, Binaifer Bharucha, Ashwini Patil